भारतातील बीचेस याचा अर्थ केवळ वाळू आणि समुद्र नाही आहे. काहीवेळा, याचा अर्थ चाट, खेळणी आणि उसाचा रस विकणारे असा असतो. इतर वेळी, एक बीच म्हणजे स्वच्छ पाणी आणि पामची झाडे, तर इतरांसाठी हे सर्व धाडसी वाटर स्पोर्ट्सबद्दल असते. पण, तुम्ही प्राचीन गोष्टी शोधात असाल, तर दमण आणि दीवचे बीच तुमच्यासाठीच आहेत.
दमणचे रमणीय बीचेस
देवका बीच
अतिशय लांब समुद्रकिनारा असलेला हा दमण बीच कुटुंबांसहित मौजमजेसाठी विशेष जागा आहे. देवका बीचमध्ये काही खडकाळ पिके आहेत, आणि त्यामुळे सगळ्याच भागांमध्ये पोहण्यास अनुमती नाही आहे. येथील करमणुकीचे पार्क मनोरंजनात भर घालते आणि मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. समुद्राच्या विहंगम दृष्यासोबत कॉफीचे झुरके घेत किंवा तळलेल्या माशांचा गरम प्लेट चाखत देवका बीचवर मजेदार फेरफटका होऊ शकतो.
माहिती: या बीचवर सोनेरी वाळू नाही आहे, तर हा बीच काळ्या मातीने भरलेला आहे.
जामपोर बीच
देवका बीचपेक्षा अतिशय भिन्न असलेल्या जामपोर बीचला स्वतःचे वेगळेच आकर्षण आहे. दमणच्या दक्षिण टोकाकडे वसलेले हे दमण बीच शांतताप्रिय लोकांसाठी उत्तम आहे. येथे करमणुकीचे पार्क किंवा तुमचे लक्ष वेधणारे संघटित असे फूड स्टॉल्स नाही आहेत. या उलट तुम्हाला जर आराम करावयाचे असेल, अरबी समुद्राच्या थंड पाण्यात पोहायचे असेल किंवा कॅज्युरिनाच्या झाडांच्या सावलीत बसवायचे असेल, तर जामपोर बीच तुमच्यासाठीच आहे
टीप: हे बीच अद्भुत सूर्यास्त प्रस्तुत करते, त्यामुळे तुमची सहल त्यानुसार ठरवा
दीवचे उत्कृष्ट बीचेस
नागांव बीच
हे छोटेसे मासेमारी करणारे गाव दीव बीचचा शानदार अनुभव देते. घोड्याच्या आकाराचे नागांव बीच पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे आणि बनाना बोट राईड, पॅरासेलिंग, जेट स्कीईंग आणि सर्फिंगपासून कमालीचे धाडसी उपक्रम पर्यटकांसाठी विविध संधी देते. नारळ आणि मक्याच्या विक्रेत्यांनी गजबजलेले नागांव बीच दीवला भेट देण्यासाठी एक अतिशय लोकप्रिय बीच आहे
माहिती: नागोवा म्हणजे “नवीन गोवा”. वसाहतवादी शासनाच्या काळात गोव्याची अनेक कुटुंबे या बीचच्या भागात स्थिरावली होती.
चक्रतीर्थ बीच
दीवच्या सुमारे मध्यभागी वसलेले चक्रतीर्थ बीच एकांतप्रेमींसाठी एकदम उचित आहे. शांत आणि वेगळेपण असलेल्या या बीचच्या कडेने खडकांचा पसराव आहे, आणि उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी खडकांची ही मांडणी अद्भुत वाटते. दीवमधील सूर्यास्त बिंदू बीचवर वसलेला आहे आणि असे म्हटले जाते की काहीही झाले तरी देखील तुम्ही येथील सूर्यास्त चुकवू नये.
माहिती: चक्रतीर्थ हे नाव त्या बीचच्या नजीक असलेल्या भगवान कृष्णांच्या मंदिरावरून आलेले आहे.
घोघला बीच
दीवपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेले घोघला बीच दीवमधील भेट दिलीच पाहिजे असे स्थान आहे, जे आरामदायक अनुभव देते. नागांव बीचएवढे गर्दीचे नसले, तरी यथे देखील तुम्ही काही वाटर स्पोर्टिंग उपक्रमांमध्ये गुंतून जाऊ शकता. आणि अंदाज करा, तुम्ही नशीबवान असला तर तुम्हाला काही डॉल्फिन्सचे दर्शन देखील होऊ शकते.
माहिती: हे बीच विवाह–पूर्व फोटो शूटसाठी एक उत्कृष्ट ठिकाण बनले आहे.
जालंधर बीच
पामच्या झाडांनी सजलेले जालंधर बीच, बीचेसवर काढलेल्या चित्रांची सुमारे वास्तविक जीवनाची प्रतिमा आहे. फारशी गर्दी नसलेले, निर्मल आणि प्राचीन असे हे बीच असून, पामच्या झाडांच्या पर्णसंभारातून क्षितिजाचे सौंदर्य निहाळण्यासाठी याहून सुरेख बीच कोठेही आढळणार नाही.
मग, तुम्हाला ताज्या, मीठयुक्त अशा दमण आणि दीवच्या समुद्रकिनारी हवेचा आनंद घ्यायचाय ना?माहिती: या बीचचे नाव पुराणातील दैत्य जालंधरला समर्पित समाधिवरून दिलेले आहे. भगवान कृष्णांनी या दैत्याचा नाश केला होता.